Posts

🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)* 🎯

  👇 *GROUP add* 👇 *`राज्यस्तरीय महागृप`* https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ *`सौजन्य व संकलन`* *--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 हे साहित्य वापरण्यासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता  👇👇👇👇👇👇 🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)* 🎯 https://whatsapp.com/channel/0029VarMvobGehEVzQBMHO0p 🔰 *नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)*  1.गोदावरी - 69000 2. भीमा - 46184 3. वर्धा - 46182 4. वैनगंगा - 38000 5. तापी - 31200 6. कृष्णा - 28700 🟠 *लांबीनुसार(किमी)*  1. गोदावरी - 668 2. पैनगंगा - 495 3. वर्धा - 455 4. भीमा - 451 5. वैनगंगा - 295 6. कृष्णा - 282 7. तापी - 208  🟠 *पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)*  1. कृष्णा - 769 2. वैनगंगा - 719 3. गोदावरी - 404 4. भीमा - 309 5. तापी - 229 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VarMvobGehEVzQBMHO0p

परतीचा फराळ

Image
 *परतीचा फराळ!* परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा ...! घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. *मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो.* निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो. ओल्या नारळाच्या करंज्या *एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं* तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात. चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर *डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी* असं माझं मत आहे. *पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो.* कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय. *प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते.* ती गृहीणींना अचूक माहीती असते. इतके दिवस विचारा...

शिक्षण बदलते आहे.....

जागतिकीकरण सुरू झाले आणि अचानकपणे भारतातल्या पोरी सुंदर असल्याचा साक्षात्कार जगाला होऊ लागला! ‘मिस वर्ल्ड’ काय, ‘मिस युनिव्हर्स’ काय, भारतीय मुली डोक्यावरचा मुकुट मिरवू लागल्या. भारतातल्या कन्या सुंदर असल्याचा साक्षात्कार होण्याचे मुख्य कारण होते, भारताची बाजारपेठ. जगाची एकपंचमांश लोकसंख्या भारतात राहते. सौंदर्याची मोठी बाजारपेठ इथे उभी राहू शकते!   🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌   * https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK* 👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा* *`सौजन्य व संकलन `* *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* तसेच आता भारतातल्या शाळा आणि भारतातले काही शिक्षक जागतिक दर्जाचे आहेत, असा साक्षात्कार जगाला होऊ लागला आहे. ज्या शिक्षकांची शिक्षणविषयक मांडणी सामान्य आहे, शिक्षक म्हणून त्यांनी काही फार मोठे योगदान दिलेले नाही, अशा शिक्षकांना अचानक डॉलर्समध्ये मोठे पुरस्कार मिळू लागले आहेत. ते शिक्षक फार मोठे काम करत आहेत, असे नाही. शिक्षणाच्या अनुषंगाने भारताएवढी मोठी बाजारपेठ जगात कुठेच नाही, हे खरे कारण. भारताची लोकसंख्या महाकाय. त्यात तरुणांची लोकसंख्या सर्वाधिक. शिकू ...

काळा ठिपका

Image
  *************************                         *बोध कथा* *************************   *काळा ठिपका* ====================   *कथां* कॉलेजमधील एका प्राध्यापकाने एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले- *"आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे."* असे म्हणून प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती.         कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता. प्राध्यापक म्हणाले, "आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत." *** मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्याचे लिहून झाल्यावर प्राध्यापकाने पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तर पत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली. कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौगोलिक रित्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ...

अखेरचा हा तुला दंडवत

Image
 👇👇 🙏🙏 भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे... १८५४ पासून सुरू झालेला प्रवास सप्टेंबर २०२५ रोजी कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे... 🙏

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर ..

Image
तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर .. प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा.. 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची.. आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय. घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं... सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात... लग्न वगैरे काही भानगडच नाही... 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा ...

एक वृक्ष - कविता

Image
  काल वडाने,आपट्याला विचारलं, दुखतंय का रे जास्त..? तुझ्याही फांद्या, तुझीही पानं, माणसाने केली ना ध्वस्त... वर्षातून एक दिवस, म्हणे आपला असतो मान, कुणी विचार करतो का, आपल्यातही असतो प्राण... त्यांचा उत्सव साजरा होतो, आपली म्हणे होते पूजा, त्यांना कुठे कळतेय मित्रा, आपल्याला होणारी ईजा.. पूर्वी बांधायचे दोर वडाला, आता फांद्या तोडून नेतात, लचके तोडून त्याच वडाला, काय तर म्हणे देव म्हणतात.. गरजेपेक्षा जास्त किती, तोडतात फांद्या नी पाने, निर्जीव झालेल्या पानांना, मग म्हटलं जातं "सोने" दुसऱ्याच दिवशी सोन्याचा, फक्त पालापाचोळा होतो, कालचा देव आज मात्र, पायदळी तुडवला जातो... कसली म्हणायची श्रद्धा ही, कसली रे पही भक्ती, स्वतःला नी निसर्गाला, फसवायचीच ही युक्ती... विरोध नाही आमचा कुठल्या, चाली रीती प्रथांना, पण बघवत नाही निसर्गाचा, ऱ्हास उगा होताना आपण कधी स्वतःला, देव म्हणवून घेत नाही, खूप आहेत दुःख आपली, पण बोलता येत नाही... आपण देतोय भरभरून, त्यांनी गरजेपुरतंच घ्यावं, सण साजरे करावे पण, आम्हालाही जगू द्यावं... - एक वृक्ष